नगर तालुक्यातील या गावांसाठी 23 व 24 एप्रिलला सरपंच आरक्षण सोडत

नगर तालुक्यातील या गावांसाठी 23 व 24 एप्रिलला सरपंच आरक्षण सोडत

नगर संवाद 
अहिल्या नगर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणुक नियम १९६४ च्या नियम २ अ नुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.त्यासाठी 23 आणि 24 एप्रिल रोजी आरक्षण सोडत करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय शिंदे यांनी सांगितले आहे.

 अहिल्यानगर तालुक्यातील एकुण १०५ ग्रामपंचायत पैकी 98 गावांच्या सरपंच आरक्षण सोडत  कार्यक्रम 23 आणि 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता  राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यु आर्टस कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी होणारी सोडतचे  प्राधिकृत अधिकारी तहसीलदार असणार असून 24 एप्रिल रोजी होणाऱ्या महिला आरक्षण सोडत कार्यक्रमाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी असणार आहेत.


अहिल्या नगर तालुक्यातील देहरे, नांदगाव व कोळपे आखाडा ग्रुप ग्रामपंचायत, शिंगवे व इस्लामपूर ग्रुप, ग्रामपंचायत , विळद,  निमगाव घाणा , कर्जुने खारे, इसळक, पिंपरी घुमट, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, डोंगरगण ,मांजरसुंबा, धनगरवाडी, इमामपूर ,शेंडी पोखर्डी नागरदेवळे , बुऱ्हाणनगर, कापूरवाडी ,वारूळवाडी, जेऊर, आगडगाव, खोसपुरी ,ससेवाडी, पांगरमल, बहिरवाडी, रतडगाव ,देवगाव , उदरम ल, निंबळक, वडगाव गुप्ता ,हमीदपूर, नवनागापूर, नेप्ती, निमगाव वाघा ,टाकळी खात गाव, हिंगणगाव, खात गाव टाकळी, जखनगाव , पिंपळगाव कौडा ,हिवरे बाजार, पिंपळगाव वाघा, अरणगाव, दरेवाडी, वाकोडी ,वाळुंज ,खंडाळा, सोनेवाडी (चास ),चास, सारोळा कासार, कामरगाव, अकोळनेर व जाधववाडी ग्रुप ग्रामपंचायत ,घोसपुरी, भोरवाडी ,खडकी, बाबुर्डी बेंद,चिचोंडी पाटील, मांडवे ,टाकळी काझी, आठवड ,उक्कडगाव, सांडवे ,सारोळा बद्धी ,मदडगाव, दशमी गव्हाण, निंबोडी, कोल्हेवाडी ,वडारवाडी, बाराबाभळी, भातोडी,  मेहेकरी, कौडगाव व जांब ग्रुप ग्रामपंचायत, रांजणी, पिंपळगाव लांडगा, सोनेवाडी ( पिला), खांडके, बारदरी, शहापूर व केकती ग्रुप ग्रामपंचायत, माथनी व बाळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत ,वाळकी, देऊळगाव सिद्धी, बाबुर्डी घुमट, शिराढोण, हिवरे झरे, दहिगाव, साकत खुर्द , गुंडेगाव, रुईछत्तीशी, राळेगण वडगाव तांदळी, गुणवडी, मठ पिंपरी ,वाटेफळ तांदळी वडगाव ,हातवळण,  अंबिलवाडी या गावांचा सरपंच निवड यावेळी करण्यात येणार आहे. आतापर्यंत या गावांचे सरपंच हे ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले गेलेले आहेत.पण प्रथमच या गावांच्या  सरपंच निवड ही जनतेतून होणार असल्याने तालुक्यातील जनतेचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post